जळगावमध्ये भीषण अपघात, महिलेसह तीन मुलांचा मृत्यू……..

देशात लोकसभा निवडणुकीचं तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. यादरम्यान जळगावध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे.

जळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जळगावमधील रामगदेववाडीजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन बालकांसह महिलेचा मृत्यू झाला आहे. दुचाकीवरील महिला आणि तिच्या दोन बालकांसह एका मुलाचा जागीच मृत्यू झालाय. मयत चारही जण हे एकच कुटुंबातील आणि रामदेववाडी गावातील रहिवासी असल्याची माहिती समजत आहे. अपघातानंतर रामदेववाडी गावातील गावकऱ्यांचा संताप व्यक्त केला आहे.

ग्रामस्थांनी दगडफेक आणि रास्तारोको करत जळगाव पाचोरा रस्त्यावरील वाहतूक अडवून ठेवली. संतप्त जमावाकडून बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांवर सुद्धा दगडफेक केली. जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठा फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की आलिशान कारच्या धडक नंतर दुचाकी पूर्ण चक्काचूर झाला आहे. तर जखमी दुचाकीस्वरावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Leave a Comment